“शनिवारी चहा घेताना गप्पा रंगतात…”
शनिवारी संध्याकाळी मित्रांसोबत कट्ट्यावर चहा घेत होतो.
सगळ्यांनी आपापल्या ऑफिसच्या कथा सांगितल्या.
थोड्याच वेळात विषय एकदम बदलला – “आपण काहीतरी सुरू करूया ना यार!”
कोणी म्हणालं – “एक कॅफे सुरू करायचा का?”
दुसरं म्हणालं – “आजकाल digital marketing फार चालतं…”
तीसऱ्याने लगेच मोबाईल काढून logo कसा दिसेल यावर discussion सुरू केलं.
एक तासभर तुफान उत्साह.
सगळ्यांच्या डोळ्यात चमक होती.
अगदी उद्याच काहीतरी सुरु करणार असल्यासारखं वाटत होतं.
आणि मग… रविवार गेला.
सोमवारी सगळे परत आपापल्या ऑफीसमध्ये.
ना त्या कॅफेचा पत्ता,
ना त्या logo चा आकार,
ना त्या discussion चा पुढचा भाग.
हे मी एकदाच पाहिलेलं नाही… दर आठवड्याला बघतोय.
मराठी माणूस व्यवसायावर प्रेम करतो, पण त्यावर action घेत नाही.
गप्पांमध्ये तो visionary असतो,
पण व्यवहारात तो employee राहतो.
का? कारण व्यवसाय म्हणजे risk.
Risk म्हणजे अनिश्चितता.
अनिश्चितता म्हणजे घरच्यांचा विरोध.
आणि विरोध म्हणजे “थांब आता – नोकरी बरी आहे.”
आपण business ची स्वप्न पाहतो, पण ती फक्त शनिवार-रविवारापुरती.
सोमवारी boss चा मेल वाचताना, आपण त्या स्वप्नांवर delete मारतो.
बोलण्यात आपण खूप पुढे असतो – “आपणही काहीतरी करू शकतो.”
पण प्रत्यक्षात त्यासाठी जी तयारी लागते – वेळ, पैसे, धाडस – ती आपण पुढे ढकलतो.
मनात असतं, पण पावलात नसतं.
व्यवसाय करणं म्हणजे सुरुवातीला अंधारात पाऊल टाकणं.
त्या अंधारात जर विश्वास नसेल, तर ते पाऊल पुढे पडत नाही.
आपल्याला कल्पना आहेत, talent आहे, पण त्या सगळ्याचं रुपांतर कृतीत करणारा “पहीला धडा” आपण टाळतो.
एकदा एका मित्राला मी विचारलं, “तू business का करत नाहीस?”
तो म्हणाला, “कधी ना कधी करूच…”
पण तो “कधी” अजून आलेला नाही.
“शनिवार-रविवार विचार करा, पण सोमवारपासून अॅक्शन घ्या.”
नाहीतर स्वप्नं कधीच routines मध्ये हरवून जातील.”